आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम्।बालीनिग्रहणं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चाद्रावण कुम्भकर्ण हनन मेतद्धि रामायणम्।।
भूतलावर राक्षस गणांचा थैमान सुरु असतांना, सर्व चराचर, ऋषि गण, मानव भयभीत असतांना ब्रह्मदेवाच्या आदेशाने सर्व देव गणांनी वानर कुळात जन्म घेतला. त्याच वेळेस, सप्तपुरी मध्ये जेष्ठ अशा अयोध्या नगरीत रघुकुलातील राजा दशरथ आपल्या पत्नी आणि वशिष्ठादि मुनींसह पुत्रप्राप्ती साठी यज्ञाचे आयोजन करत असतात. या यज्ञातून अग्निपुरुष प्रगट होतो आणि पायस पात्र अर्पण करत दशरथाला सांगतो कि योग्य वेळी भगवान विष्णू आपल्या अंश रूपाने तुझ्या पुत्र रूपात अवतीर्ण होणार आहेत. राजा दशरथ आपल्या
तीनही राण्यांना पायसाचा प्रसाद देतो.
अश्वमेध यज्ञ संपून बारा महिने उलटतात आणि चैत्र महिन्यातील नवमीचे दिवशी, पुनर्वसु नक्षत्रावर, दुसऱ्या प्रहरात महाराणी कौसल्येचा पोटी राम जन्मला......
याच दाशरथी रामाचा आज जन्मोत्सव. रामजन्मोत्सवाच्या निमित्याने मूर्तिकलेतील रामचंद्राचे दर्शन घडवण्याचा छोटासा प्रयत्न....
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ।
पुराणात तीन रामांचा आवर्जून उल्लेख होतो :
१. भार्गव राम (परशुराम)२. दाशरथी राम (सीतापती राम )
३. बलराम
१,२,३ चित्रे पवनी,जिल्हा भंडारा येथील स्तंभावरील आहेत.
रामायणातील काही प्रसंग :
आश्रमात वार्तालाप करतांना राम, लक्ष्मण आणि सीता... समोर सुवर्णमृग...
(मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)
तोडितां फुले मी सहज पहिला जाता, मज आणुनी द्या तो हरीण अयोध्या नाथा ......
सुवर्णमृगाचा हट्ट करणारी सीता ....... (मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)
मृगाची शिकार करतांना राम ..... सीतेच्या आग्रहामुळे रामाला शोधायला आलेला लक्ष्मण, आणि राम-लक्ष्मण भेट... (मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)
याचक रूपात आलेल्या रावणाला भिक्षा घालतांना सीता.... मूळ रूपात येऊन सीता हरण करतांना रावण...
(मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)
"मरणोमख
याला
का
मारसी रघुनाथा
अडवीता
खलासी पडलो, पळविली रावणे सीता"
रावण जटायू युद्ध.... जटायूशी वार्तालाप करतांना राम-लक्ष्मण.(मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)
१. २. ३. ४. ५.
राम - रावण युद्धपट, (अंचलेश्वर महादेव मंदिर, चंद्रपूर येथील शिल्पपट ).
१. हीच ती रामांची स्वामींनी...... अशोक वृक्ष, त्याखाली बसलेली सीता आणि मुद्रिका देतांना हनुमंत
२. युद्धासाठी निघालेला रावण
३. राक्षस सैन्य
४. वानर सैन्य
५. इंद्र रथातुन युद्धाला सज्य राम
राम- रावण युद्ध (मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)
रावण वधानंतर श्रीराम, माता जानकी, लक्ष्मण, हनुमंतासह अयोध्येला परततात. योग्य मुहूर्त पाहून रामांना राज्याभिषेक करण्यात येतो... प्रभू रामचंद्र अयोध्यापती होतात...
पृष्ठतो लक्षमणम देवं सछत्रं कणकप्रभम ।
पार्श्वे भारत शत्रुघ्न चामर व्यंजनांवितौ ।
अग्रे अव्यग्रम हनुमंतम रामानुग्रह कांक्षिणां ।।
रामचंद्रांचा राज्याभिषेक करतांना लक्ष्मण आणि भरत व छत्रधरी शत्रुघ्न आणि हनुमान
( मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम: ॥
सिहासनाधीश प्रभू राम, वामांगी जनक कन्या सीता आणि चरणाशी भक्तश्रेष्ठ हनुमंत (पवनी,जिल्हा भंडारा )
राम राज्याभिषेकानंतर सर्वत्र आनंदाचं, उत्साहाचं वातावरण निर्माण झालं, खऱ्या अर्थाने रामराज्याला सुरुवात झाली.
या रामनवमीच्या पावन पर्वावर आपल्याला प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद लाभो व सर्वत्र मंगलमय हो ह्याच मंगल कामना...





